आपल्या बारा पिढ्यात असे कोणी लिहिले होते काय?
अत्र्यांच्या बाबतीत असे नि:शंकपणे म्हणता येईल की, त्यांचे मनन, त्यांचे भाषण आणि त्यांचे लेखन ही परस्परांशी अधिकात अधिक इमान राखतात. त्यांच्या भाषणांमधून आणि लेखनामधून त्यांच्या मनातील खळबळ आणि शुद्धाशुद्ध सगळेच्या सगळे नजरेला दिसते. आणखी एका आणि मोठ्या दृष्टीने ती पारदर्शक आहे, अत्रे ज्या समाजात व ज्या समाजाचे म्हणून उभे होते, त्याच्याही मनाचा तळ आपण पाहू शकतो; असा पारदर्शकपणा विरळा आहे.......